• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार ; संभाजीराजेंचा हल्लाबोल !

editor desk by editor desk
September 23, 2024
in राजकारण, राज्य
0
जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार ; संभाजीराजेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरु असून आज सोमवारी त्यांच्या उपोषणाला सातवा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावली असतांना नुकतेच स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या आंदोलनाच्या 7 व्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या प्रकृतीस काही अपाय झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकते. जरांगेंची प्रकृती बिघडली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना उठावे-बसावे लागत आहे. तसेच त्यांनी सातव्या दिवशी सुद्धा उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेत विचारपूस केली आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांकडे देखील मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा तापलेला असताना ओबीसी नेत्यांकडून आरोप होत असताना संभाजीराजे छत्रपती जालन्यात मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार असून आता मराठा आरक्षणावर सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार कसे आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवे आहे. हे आरक्षण कसे टिकणार यावर बोलायला हवे, असे ते संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, अठरापगड जातींसह बारा बलुतेदारांना न्याय दिला. त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात त्या सरकारने सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

Previous Post

जळके येथील बालकांच्या आरोग्याच्या तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

आ.गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान : तर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !

Next Post
आ.गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान : तर  कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !

आ.गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान : तर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group