छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजी नगरातील इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने खळबळजनक आरोप तर सर्वच आपबीती देखील सांगितली आहे.
आम्ही आळंदीला पळून जाऊन विवाह केला. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. मी आणि अमित ९ जूनला पोलिस ठाण्यात आलो होतो. पुण्यात असताना आम्हाला मदत करणाऱ्या मित्रांच्या माध्यमातून ‘सैराट’ करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांतही लेखी तक्रार केली होती. तरीही माझ्या चुलत भावाने माझ्या नवऱ्यावर चाकूने सात वार करून संपवले, असे मृत अमितची पत्नी विद्या साळुंके हिने सांगितले आहे.
आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने वार केले होते. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. बालपणीची मैत्रीण विद्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतलेे. विद्याच्या कुटुंबीयांना त्यांना स्वीकारले नव्हते. पोलिसांनी शनिवारी विद्याचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही याला अटक केली होती. रविवारी जवाहरनगर पोलिसांनी अमितचा सासरा गीताराम कीर्तिशाही व त्याला साथ देणाऱ्या स्वप्निल पट्टेकर याला पोलिसांनी जालन्यातून अटक केली.