• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

editor desk by editor desk
April 13, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

जळगाव : प्रतिनिधी

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे.

लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे.
हवामान खात्याने वर्तविला अंदाज खरा ठरला आहे. मागील दोन दिवसापासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. आज सकाळपासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. भाजीपाला, फळबागा आणि अन्य पिकांना बुरशी लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.आंबा पिकाचे मोठे नुकसान भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अकाळी पावसाची झळ ६५०६ शेतकऱ्यांना बसलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील एकूण ३४११ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे या तीनही तालुक्यांतील ३४११ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. १२३ गावांमधील ६५०३ शेतकऱ्यांना’अवकाळी’ची झळ बसली आहे. मक्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्यांचे काम सुरू केले. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. त्यात मक्याचे सर्वाधिक, तर ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, भाजीपाला, केळी, आंबा आणि लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

 

Previous Post

पिंप्री शिवारात दोन वाहनांची धडक : चार जण जखमी

Next Post

विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी लिहले रक्ताने पत्र !

Next Post
विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी लिहले रक्ताने पत्र !

विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी लिहले रक्ताने पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group