• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विजेचा धक्का लागल्याने १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू !

editor desk by editor desk
April 2, 2024
in अमळनेर, क्राईम
0
विजेचा धक्का लागल्याने १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू !

अमळनेर : प्रतिनिधी

नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल योगेश पाटील (वय १२) असे मयत बालकाचे नाव आहे. हर्षल हा अमळनेर शहरातील साने गुरुजी शाळेतील सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील हे शेती करतात. शिक्षणासाठी तो आई, वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील साई गजाजन नगरात वास्तव्यास होता. १ रोजी त्याचे आई, वडील सबगव्हाण येथे शेतात तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. या वेळी हर्षल एकटाच घरी होता. दुपारी १ वाजता नळाला पाणी आल्याने हर्षल हा पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी गेला. या वेळी मेल-फिमेल पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने नजरचुकीने त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जिन्याखालीच कोसळला अन् मयत झाला. दरम्यान, मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला दिसला. मात्र, तोपर्यंत उशिर झाल्याने हर्षल जीवानिशी गेला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हर्षलला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता सबगव्हाण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत. हर्षलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण गाव व अमळनेर परिसर शोक व्यक्त केला जात आहे.

Previous Post

दीड लाखांची लाच घेताना निरीक्षकासह तीन अडकले

Next Post

भाजपने उमेदवारी नाकारली : खा.उन्मेष पाटलांनी घेतली राऊतांची भेट

Next Post
भाजपने उमेदवारी नाकारली : खा.उन्मेष पाटलांनी घेतली राऊतांची भेट

भाजपने उमेदवारी नाकारली : खा.उन्मेष पाटलांनी घेतली राऊतांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group