• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात भुरट्या चोरांचा उद्रेक : चार दुकाने फोडली

editor desk by editor desk
March 8, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगावात भुरट्या चोरांचा उद्रेक : चार दुकाने फोडली

धरणगाव : प्रतिनिधी

शहरातील  नगरपालिके समोरील मोटर रिवाइंडिंगची चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून या दुकानांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांसह व्यापारी धास्तावले असून चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

धरणगावातील सचिन भागवत यांचे रेणुका मशनरी रिपेरिंगचे दुकान असून या दुकानातील २१ हजारांची ७० किलोची कॉपर तार २९ फेब्रुवारीला तर ९ हजारांची ३० किलो कॉपर तार ७ मार्चला चोरुन नेली होती. यात त्यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. तर राजेंद्र चोरी यांच्या हितेश इलेक्ट्रिकल दुकानातील १५ हजारांची ५० किलो कॉपर तार तसेच सत्तार खान पठाण यांच्या रॉयल इलेक्ट्रिक दुकानातील ७ हजार ५०० रुपयांची २५ किलो कॉपर तार असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांची कॉपर तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन पोबारा केला आहे. यात कापुरे इलेक्ट्रिकलचे पत्रे कापून चोरट्यांनी चोरी केली आहे. या प्रकरणी सचिन सुभाष भागवत यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आठ दिवसा पूर्वीसुद्धा हीच दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्यावेळी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच ६ रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मोटर रिवाइंडिंगचे दुकानाचे संचालक आले होते. परंतु, पोलिसांनी त्यांची समजूत काढून आम्ही तपास करू, असे आश्वस्त केले होते. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा चारही दुकानातून चोरट्यांनी चोरी केली. तर ४ तारखेला ही स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटीतील ७ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत. धरणगावात पोलिसांच्या धाक संपला आहे म्हणूनच भुरट्या चोरांचा उद्रेक वाढला आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तर पोलिसांनी भुरट्या चोरांविरुद्ध त्वरित कारवाई करुन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी दुकानदार व नागरिक करत आहेत. तर धरणगावात पोलिसांनी रात्री गस्ती वाढवावी, अशी मागणीही होत आहे.

Previous Post

दहावीच्या पेपरला कॉपी ; केंद्रप्रमुखासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

जळके- एरंडोल रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Next Post
जळके- एरंडोल रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

जळके- एरंडोल रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !
क्राईम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !

July 18, 2025
“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !
राजकारण

“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !

July 18, 2025
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
राजकारण

विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !

July 18, 2025
व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद
क्राईम

व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp