• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आंबेडकरांचे आवाहन : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी

editor desk by editor desk
February 14, 2024
in राजकारण, राज्य
0
आंबेडकरांचे आवाहन : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी

मुंबई : वृत्तसंस्था

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही. आमरण उपोषणातून जी जनजागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षणासाठी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगेंनी कोणत्याही पक्षाच्या आधाराने निवडणूक का लढवू नये? याचे उत्तरही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिले. व्यक्तीने एखाद्या पक्षाच्या आधाराने निवडणूक लढवली, तर त्या व्यक्तीवर त्या पक्षाची बंधने येतात. या बंधनांमुळे गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगे लोकसभेच्या निवडणुकीत बिनधोकपणे निवडून येतील असा दावाही केला. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. आमची भूमिका ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

 

Previous Post

धरणगावातील बंद घर चोरट्यांनी फोडले

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group