• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नऊ महिन्याच्या मुलासह त्याने गाठले पोलीस स्टेशन अन दिली पत्नीच्या हत्येची कबुली !

editor desk by editor desk
July 27, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
नऊ महिन्याच्या मुलासह त्याने गाठले पोलीस स्टेशन अन दिली पत्नीच्या हत्येची कबुली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशातील अनेक गुन्हेगारी तोंडवर काढत असतांना गेल्या काही महिन्यापासून प्रेमात जुडलेले विवाह पुढे जावून शेवटच्या टोकावर पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येवू लागल्या आहे. आसाम राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात घडली. तिघांच्या हत्या करुन त्यानं ९ महिन्यांच्या मुलासह पोलीस ठाणं गाठलं. आपण तिघांची हत्या केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आणि आत्मसमर्पण केलं. त्यानं दिलेली माहिती ऐकून पोलिसांनी त्यानं सांगितलेलं ठिकाण गाठलं. तिथे तिघांचे मृतदेह होते. नाजीबूर रहमान बोरा असं आरोपीचं नाव आहे. त्यानं चाकूनं भोसकून तिघांना संपवलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.

नाजीबुर रहमान बोरा आणि संघमित्रा घोष यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये झाला होता. नाजीबुर मॅकेनिकल इंजिनीअर आहे. जून २०२० मध्ये तो फेसबुकच्या माध्यमातून संघमित्राच्या संपर्कात आला. काही महिन्यांनंतर दोघे पळून कोलकात्याला गेले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी लग्न केलं. संघमित्राचे आई-वडील तिला पुन्हा घरी घेऊन आले. २०२१ मध्ये त्यांनी संघमित्रावर घरात चोरी केल्याचा आरोप केला. पोलिसात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. त्यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर ती आई, वडिलांकडे राहू लागली. जानेवारी २०२२ मध्ये संघमित्रा आणि नाजीबुर पुन्हा एकदा पळाले. यावेळी दोघे चेन्नईला गेले. तिथे ५ महिने राहिले. दोघे आसामला परतले, त्यावेळी संघमित्रा गर्भवती होती. ती नाजीबुरसह त्याच्या घरी राहत होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये तिला मुलगा झाला. यानंतर चार महिन्यांनी संघमित्रानं नाजीबुरला सोडलं आणि ती आई, वडिलांच्या घरी गेली. तिनं नाजीबुरविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. नाजीबुर मारहाण करत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं. त्यानं हत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा केला. यानंतर नाजीबुरला अटक झाली. नाजीबुरला २८ दिवसांनी जामीन मिळाला.

मुलाला भेटण्यासाठी तो संघमित्राच्या घरी पोहोचला. मात्र संघमित्राच्या आई वडिलांनी त्याची भेट होऊ दिली नाही. २९ एप्रिलला नाजीबुरच्या भावानं संघमित्रा आणि तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. २४ जुलैला दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. मुलाला भेटू देत नसल्यानं नाजीबूर संतापला. त्यानं पती आणि तिच्या आई, वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्यानं ९ महिन्यांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि गुन्ह्याची माहिती दिली.

Previous Post

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; आरोपीला पाच वर्षाची शिक्षा !

Next Post

मध्यरात्री रस्त्यावर तरुणाला मारहाण करीत लुटले !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

मध्यरात्री रस्त्यावर तरुणाला मारहाण करीत लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group