Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट ; होणार जंगी स्वागत !
    जळगाव

    आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट ; होणार जंगी स्वागत !

    editor deskBy editor deskJune 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    गेल्या काही महिनाभरापासून बंद असलेल्या शाळा‎ उन्हाळी सुटीनंतर गुरुवारपासून सुरू होत‎ आहेत. शिक्षण विभाग पहिल्याच दिवशी‎‎ विद्यार्थ्यांचे जल्लोषात ट्रॅक्टर- बैलगाडीतून‎ स्वागत करणार‎ आहे, तर शाळेत प्रथमच‎ पाऊल‎ ठेवणाऱ्या बालवर्गातील बच्चे‎ कंपनीच्या‎ पाऊलखुणांचे जतन केले जाणार‎ असून‎ भिंतीवरही हातांचे ठसे उमटवणार‎ आहेत.‎ त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने‎ जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना‎ शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण‎ व्हावी यासाठी पहिली-बालवाडीतील‎ विद्यार्थ्यांचे ढोल-ताशे, लेझीम पथकांच्या ‎ ‎गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात ‎ ‎ येणार आहे. या‎ प्रवेशोत्सवात पहिल्याच‎ दिवशी पोषण‎ आहारात गोड शिरा, बुंदीचा‎ लाडू मुलांना‎ देण्यात येणार आहे.

    विद्यार्थ्यांची ‎ ‎ गुणवत्ता‎ सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती‎ ‎ ‎ घेण्यात आले आहेत. यंदा नव्या शैक्षणिक‎ ‎ ‎ सत्रातही हसत-खेळत शिक्षणावर भर‎ दिला ‎ ‎ असून वेगळे उपक्रम राबवण्यासाठी‎ शाळांना ‎ ‎ टार्गेट दिले आहे.‎ अन्नामृत फाउंडेशनतर्फे मनपा शाळेतील ३५ हजार मुलांना मोफत रागी चोकोलाडू,‎ बुंदीच्या लाडवांचे वाटप करणार आहे. या वेळी प्रशासक जी. श्रीकांत, अन्नामृतचे‎ राजन नाडकर्णी, डॉ. रमेश लढ्ढा, सुदर्शन पोटभरे आदी उपस्थित राहणार आहेत.‎ आज सर्व शाळा सुरू होत आहेत. बालकाला शाळेत प्रवेशित करून त्याला‎ हसत-खेळत आनंददायी शिक्षण देणे ही शाळा, शिक्षक, पालकांची जबाबदारी‎ आहे. शाळेची सुरुवात ही चैतन्यमय व उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व‎ विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. त्यासाठी शाळा‎ प्रवेशोत्सवाचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल, मिठाई किंवा‎ शालेय साहित्य देऊन स्वागत करावे, मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा‎ समावेश करावा, असे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिले.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.