• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हरवलेले बालक सापडले अन पालकांचे अश्रू अनावर !

एमआयडीसी पोलिसांनी बजावली कामगिरी

editor desk by editor desk
May 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
हरवलेले बालक सापडले अन पालकांचे अश्रू अनावर !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील दोन बालक खेळत असतांना हरविले होते. त्यांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कामगिरीसह बालकांची माहिती देणा-या सुज्ञ नागरिकाचे देखील बालकांच्या पालकांनी आभार व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपुर कुसुंबा येथे कार्तिक जयसिंग परदेशी हा सहा वर्षाचा आणी त्याच्यासोबत प्रियांशु अजयकुमार वर्मा हा चार वर्ष वयाचा बालक दि.१८ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन्ही सोबत खेळत असतांना दोन्ही बालक अचानक बेपत्ता झाले. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाले. दोन्हीबालकांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत आपली व्यथा मांडली.

यापैकी कार्तिक हा बालक मुकबधीर होता. पालक आणी पोलिस यांच्याकडून आपल्या पातळीवर दोघा बालकांचा शोध सुरु असतांना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रिजवान शेख गणी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला संपर्क साधला. दोन अनोळखी बालके एमआयडीसी परिसरातील साईनगर परिसरात फिरत असून ती रडत असल्याची त्यांनी माहिती दिली. माहिती मिळताच पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. ईम्तीयाज खान, पो.ना. ईम्रान सैय्यद, पो.ना. सचिन पाटील, महिला पोलिस नाईक निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मन्यारखेडा रस्त्यावर दोन्ही बालके कासावीस झाल्याचे दिसून आले. त्यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दोन्ही बालकांना खाऊ देत त्यांच्या डोक्यावर हात फिरवून शांत केले. दोघा बालकांना पोलिस स्टेशनला आणून बसवण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत दोघा बालकांचे पालक पोलिस स्टेशनला हजर झाले होते. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह रिजवान शेख यांच्या उपस्थितीत दोघा बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बालक आणी पालक दोघांची भेट झाल्याने दोघांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.

Previous Post

पाच वर्षीय मुलीसह पती पत्नीचे गळफास घेतलेले मृतदेह आढळले !

Next Post

महिला नेत्याला ठाकरे गटाच्या पदाधिकारीने दोन लगावल्या !

Next Post
महिला नेत्याला ठाकरे गटाच्या पदाधिकारीने दोन लगावल्या !

महिला नेत्याला ठाकरे गटाच्या पदाधिकारीने दोन लगावल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group