Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ पेपर फुटी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात !
    क्राईम

    ‘त्या’ पेपर फुटी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात !

    editor deskBy editor deskMarch 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    राज्यात बारावीची परीक्षा सुरु असतानाच एक मोठी घटना घडली होती. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पेपर फुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाही.

    राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने पेपर फुटीच्या मुद्दावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला धारेवर धरलं. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. विधीमंडळातील गोंधळानंतर सरकारने याप्रकरणी कडक कारवाई आदेश दिले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या पेपर फुटीमुळे ही परीक्षा आहे की शिक्षणाचा खेळखंडोबा असा प्रश्न जनतेला पडला आहे. या प्रकरणानंतर बुलढाण्यातील 4 परीक्षा केंद्रांचे संचालक तडकाफडकी बदण्यात आले आहेत.

    शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, पुन्हा गणिताचा पेपर घेतला जाणार नाही. गणिताचा पेपर फुटली ही पहिली घटना नाही. परभणीत इंग्रजीचा पेपर फुटला होता. शिक्षण विभागाच्या या गलथान कारभामुळे हौतकरु विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी आहे. एका पाठोपाठ दोन पेपर फुटल्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बारावीची परीक्षा सुरु आहे की गंमत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.