• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !

editor desk by editor desk
March 4, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून कुठल्याही प्रकारे हि गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेतच नाही. नर्मदेच्या कालव्याच्या नजीक घडली आहे. एकाच कुटुंबातील 7 जणांनी कालव्यात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. ही घटना राजस्थान येखील असून इथल्या एका कुटुंबियांतील पती पत्नीच्या वादामुळे घरातील सगळ्यांचेच प्राण गेले आहेत. एका कॉल रेकॉर्डनं हा घात केला असल्याचे समोर आले आहे. परंतु नक्की असं काय झालं ज्यामुळे ही घटना घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार, या केसमध्ये पत्नीचे घरापाशीच राहणाऱ्या दुसऱ्या एका इसमाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरूषाशी प्रेमसंबंध असल्याचे कळताच पतीनं याबद्दल पत्नीला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यासंदर्भात ग्रामपंचायतीतही या पतीनं आपल्या कुटुंबातील या समस्येची व्यथा मांडली होती परंतु त्यातून फार काही पदरी पडले नव्हते त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद सुरू होते. या दोन पती-पत्नींना 5 मुलंही होती.

आपल्या परिवारासोबत मोकळा वेळ घालवावा या अर्थानं ते दोघंही आपल्या 5 चंही अपत्यासंह फिरायला गेले होते. परंतु त्या प्रवासात असे अचानक काय घडले काय त्या दोघांनी आपल्या पाचही मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी मारत जीव दिला आहे. त्या सर्वाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे त्यातून मृत पतीच्या भावानं पत्नीच्या प्रियकराविरूद्ध पोलिसात तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. त्यातून या प्रकरणाचा सखोल तपासही पोलिस घेत आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एकाच चितेवर सात जणांना मुखाग्नी दिला आहे.
या प्रकरणाची सुरूवात पत्नीचे असलेले विवाहबाह्य संबंध हे होते. एकदा पत्नीचे फोनवरचे बोलणे त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं ऐकले आणि त्यामुळे एकेदिवशी तिचा मोबाईल चोरून तिच्या फोनमधील रेकॉर्डींग ऑन केले आणि पुढच्या वेळी तिचे कॉल्स रेकॉर्ड (Call Recording) झाले त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. पतीनं तिला बजावलेही की त्याच्याशी परत बोलायचे नाही परंतु पत्नीनं ते काही ऐकले नाही त्यांचे संबंध सुरूच राहिले आणि मग त्यावरून पती-पत्नीमध्ये भांडणं सुूरू झाली. त्या दिवशीही तेच झाले असावे. परंतु परिवारानं एकत्र जीव का दिला याचा तपास अजून लागला नाही.

Previous Post

मनसे नेत्यावर हल्ला : ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी अटकेत !

Next Post

या कारणासाठी मनसे नेत्यावर हल्ला ; आरोपींनी दिली कबुली !

Next Post
या कारणासाठी मनसे नेत्यावर हल्ला ; आरोपींनी दिली कबुली !

या कारणासाठी मनसे नेत्यावर हल्ला ; आरोपींनी दिली कबुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group