जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील एका भागात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी 23 मे रोजी दुपारी 3.30 वाजता घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी 24 मे रोजी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात 21 वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील सागर खंडू पाटील याने तरुणीला फोन करून व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ करून तो तिच्या नातेवाईकांना व्हायरल करून तिची बदनामी केली. हा प्रकार…
Author: user
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शेळगाव बॅरेज या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, असे मागणी जळगाव तालुक्यातील धामणगाव, नांद्रा, इदगाव, खापरखेडा आवार, विदुर, डीकसाई, ममुराबाद गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी २५ मे रोजी दुपारी २ वाजता भेट घेऊन आवर्तन सोडण्याबाबत चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेळगाव बॅरेजमधून रविवारी २६ मे रोजी सकाळी ७ आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी पंचायत समिती सभापती जनार्दन आप्पा, नाना पाटील, संजय भालेराव, विजय भालेराव, पंढरी भालेराव, शांताराम पाटील, प्रल्हाद पाटील, रघुनाथ महाजन, शिवाजी सपकाळे,…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट येथील नेत्रम ऑप्टिकल्स समोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदू महारु भोई वय-४३, रा. शिवशंकर कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते गोलाणी मार्केट जवळील नेत्रम ऑप्टिकल समोर मुरमुरे शेव विक्री करण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे १९ मे रोजी दुपारी १ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीआर ५९४६) दुकानासमोर लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. दरम्यान दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर…
जळगाव प्रतिनिधी । चारण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा मुर्दापूर धरणाच्या पाण्यात होण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 25 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे याप्रकरणी पोलिसात आकस्मात भरतीची नोंद करण्यात आली. हर्षल अशोक चौधरी (वय १४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षल चौधरी हा मुलगा अंघोळीसाठी मुर्दापूर धरणाच्या पाण्यात पोहणाासाठी उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाच बहीणींचा एकुलत्या एक भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथील शेतात उष्माघातामुळे 100 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीला आली आहे. यामध्ये मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठिकाणी तहसीलदार यांच्या पथकाने तातडीने पंचनामे करावे असे आदेश देण्यात आले आहे. ‘सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हिडिओ कॉल द्वारे दिली असून शासन व प्रशासन सर्वतोपरी आपल्या सोबत असून हवी ती मदत आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना दिलासा दिला. याप्रसंगी अशोकभाऊ कांडेलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, पंकज पांडव, रणजीत गोयंका,सतीश नागरे, विनोद चौधरी, दीपक वाघ, दिलीप भोलानकर, अविनाश…
जळगाव प्रतिनिधी । बाहेरून काम आटोपून खोलीकडे परत जात असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात भरधाव दुचाकी झाडाला धडकून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (केसीएन) गुरुवारी २३ मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. नीरज लीलाधर भामरे (वय २३, रा. मोराणे प्र. न. ता. जि. धुळे, ह. मु. स्टाफ क्वार्टर, उमवी नगर, कबचौ उमविद्यापीठ परिसर ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील लीलाधर असून ते विद्यापीठाचेच कर्मचारी आहे. नीरजची आई, बहीण, मावशी हे काही वर्षांपूर्वी नाशिकवरून परतताना झालेल्या कार अपघातात मयत…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाच्या मृत्यू झाल्याची घटना १६ मे रोजी पहाटे ३ वाजता घडली होती. या प्रकरणी चौकशी अंती गुरुवार २३ मे रोजी रात्री ९ वाजता अज्ञात वाहन चालकावर नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हीरालाल सखाराम सोलंकी वय-३५, रा. मनारखेडा ता. जि.जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, १६ मे रोजी पहाटे ३ वाजता हिरालाल सोलंकी हा तरूण नशिराबाद टोल नाक्याजवळ पाहिजेत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार दिली होती. त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटना घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक…
धरणगाव : प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील हिताची कंपनीच्या आवारातून 7 हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियल आज्ञाच चोरट्याने चोरून नेल्याची घटना 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती गुरुवार 23 मे रोजी दुपारी 5 वाजता धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात हिताची या नावाची प्रायव्हेट कंपनी आहे. दरम्यान 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या कंपनीच्या आवारात असलेले 7 हजार रुपये किमतीचे 37 किलो अल्युमिनियमचे मटेरियल चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर चौकशी अंती अखेर गुरुवारी 23 मे रोजी…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ रोडवरील कार बाजारसमोर कारमधील अनोळखी 4 जणांनी दुचाकीवर असलेल्या दोन जणांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण करून डोक्यात लाकडी दांडका टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की, हिमांशू ज्ञानेश्वर पांडे वय-20 रा. खोटे नगर गौरव पार्क, जळगाव हा तरुण आपला मित्र साहिल सपकाळे यांच्यासोबत 21 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावकडून भुसावळकडे जात असताना कार बाजार जवळ समोरून येणाऱ्या कारमधील अज्ञात चार जणांनी काहीही कारण नसताना त्यांची दुचाकी थांबवून हिमांशू पांडे आणि त्याचा मित्र…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा रस्त्यावर असलेल्या रामदेववाडी गावाजवळ दि.७ मे रोजी भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला होता. गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाधिकारी, सरकार पक्ष आणि संशयितांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोघांना सोमवार २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण वय-२६ या आशासेविका ह्या ७ मे मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्या मुलगा सोहम वय-७, सोहमेश वय-४ आणि १६ वर्षीय भाचा लक्ष्मण नाईक असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक (एमएच१९ ईई ८९२५) ने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर…

