Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी जीभ छाटली पाहिजे ; रुपाली पाटील
    राजकारण

    ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी जीभ छाटली पाहिजे ; रुपाली पाटील

    editor deskBy editor deskDecember 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सातत्याने होत असलेले वादग्रस्त वक्तव्याची मालिका संपताना संपत नाही आहे. महाराजांबद्दल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, असा वक्तव्य त्यांनी केले. लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

    शिवरायांबद्दल वादाची मालिका काही खंडीत होत नसल्याने राज्यभर संतापाचे वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर असे वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. शिंदे यांच्या बंडाशी, त्यांच्या सुरत आणि गुवाहाटी दौऱ्याशी महाराजांच्या आग्रा सूटकेचा संदर्भ देण्यात येत आहे. राज्यपालांनी तर शिवाजी महाराज जून्या जमानाचे आता गडकरी आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. औरंगाबाद येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते. राज्यभरात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मराठा संघटनांनी याविरोधात आवाज उठविला. संभाजी राजे, उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात कडक भूमिका घेतली. पण वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. सरकारमधील नेते, आमदार वाद ओढावून घेत आहेत.प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेल्याचे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. उठसूट वादग्रस्त वक्तव्य होत असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.