लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव : धरणगाव तालुक्यातील अहिरे येथे दळणवळणाची साधने सोईस्कर व्हावे यासाठी सात कोटी रुपये मंजूर करून पूल बांधण्यात आला मस्त वाल ठेकेदाराने हा निकृष्ट केला असून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांना तुमच्याकडून काही होणार नाही पीडब्ल्यूडी चे अधिकारी हप्ते घेऊन मोकळे झाले आहे त्यामुळे हा मस्तवाल ठेकेदार अक्षर शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करताना दिसत आहे. अहिरे येथील ग्रामस्थांनी काम बंद केले असून या पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे नॉन टेक्निकल माणूस सुद्धा सांगू शकतो परंतु पीडब्ल्यूडी चे अधिकारी हे ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन बिल काढण्यास तयारीत आहेत काही बिल देखील निघालेले आहेत.
पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना केवळ पैसा दिसतो काम अजिबात दिसत नाही. अक्षरशा थातूरमातूर हा पूल झाला असून क्वालिटी कंट्रोल विभागाने तपासणी केली तर पीडब्ल्यूडी व ठेकेदाराचे पितळ उघडे पडणार आहे. मस्त वाल ठेकेदार हा अक्षरशा अनेक कामांमध्ये बोगस काम केलेत असल्याने यावेळेस या कामाला मंजुरी झाली त्यावेळेस अधिकाऱ्यांना दहा टक्के रक्कम देऊन हे टेंडर या मस्तवाल ठेकेदाराने घेतले आहे.
ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या तरी माझे काही होणार नाही असे अविर्भावात हा मस्तवाल ठेकेदार आहे. पीडब्ल्यूडी च्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता याबाबत गावकरी जाब विचारणार असल्याचे सांगण्यात आले. पीडब्ल्यूडी चे अभियंता व कार्यकारी अभियंता हे जागेवर नसतात त्यामुळे गावकऱ्यांची भेट झाली नाही. लवकरच आंदोलन होईल असा इशारा देखील गावकऱ्यांनी यावेळी दिला आहे.



