Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
    क्राईम

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    editor deskBy editor deskApril 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबईतील वरळी परिसरात महायुतीच्या आक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका सामान्य महिलेने भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारल्याची घटना चर्चेत आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विरोधकांनी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

    या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित महिला अत्यंत संतप्त अवस्थेत होत्या आणि त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती. त्या वेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे अपेक्षित होते, असेही महाजन यांनी नमूद केले.

    महाजन यांच्या म्हणण्यानुसार, हा मोर्चा महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वरळी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

    घटनेबाबत बोलताना महाजन म्हणाले की, मोर्चा सुरू असताना संबंधित महिला घटनास्थळी आल्या आणि त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलिसांशीही अरेरावी केल्याचा आरोप महाजन यांनी केला. तसेच परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत असताना पाण्याची बाटली फेकल्याची घटनाही घडल्याचे त्यांनी सांगितले.

    “आम्ही पोलिसांच्या परवानगीने आणि ठरलेल्या मार्गानुसार मोर्चा काढला होता. रस्ता 10-15 मिनिटांत मोकळा करण्याचेही आम्ही सांगितले होते. मात्र त्या महिलेने परिस्थिती समजून न घेता तीव्र प्रतिक्रिया दिल्या,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

    मोर्चाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याबाबत विचारले असता, महाजन यांनी नियोजनात कोणतीही चूक झाली नसल्याचे सांगितले. सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत परवानगी घेऊन मोर्चा काढण्यात आला होता आणि याबाबत पोलिसांना पूर्ण माहिती देण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

     

    या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून मोर्चादरम्यानची ही शाब्दिक चकमक आणि त्यानंतरची प्रतिक्रिया यावरून पुढील काळातही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026

    चिंचोलीत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.