Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवसेना कोणाची ? कायद्याने असा घेतला जाईल निर्णय !
    राजकारण

    शिवसेना कोणाची ? कायद्याने असा घेतला जाईल निर्णय !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धरपकड सुरू आहे. शिंदे गटाचा दावा आहे की खरी शिवसेना त्यांची आहे, शिवसेना पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्हावर त्यांचा दावा आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे आणि या संदर्भात निकाल देण्याची मागणी केली आहे.

    ४ जुलै रोजी झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गटाच्या बाजूने ४० आमदारांनी मदतान केले. ७ जुलै रोजी ठाणे मनपातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. मुंबईनंतर ठाणे मनपा सर्वात मोठी आहे. इतक सर्व झाल्यानंतर १८ जुलै रोजी नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. विशेष गोष्ट ही की शिवसेने पक्षाच्या प्रमुख पदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी केली नाही.

    लोकसभेत शिवसेनेचे १९ तर राज्यसभेत ३ खासदार आहेत. शिंदे गटाने दावा केलाय की १९ पैकी १८ खासदार त्यांच्या सोबत आहेत. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाचे लोकसभेतील नेते म्हणून खासदार राहुल शेवाळे यांना मान्यता दिली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली नसली तरी १८ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या २२ खासदारांनी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले होते.

    निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे, कागदपत्रे आणि संख्या बळाच्या आधारावर कोणत्या तरी एका गटाला मान्यता देते. अशा स्थितीत पक्षाचे मुळ नाव आणि निवडणूक चिन्ह त्या गटाला मिळते ज्याच्या बाजूने बहुमत असते. या परिस्थितीत दुसऱ्या गटाला नव्या पक्षाची नोंदणी करण्यास सांगून नवे चिन्ह घेण्यास सांगते.दोन गट पुन्हा एकत्र आले तर ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. तेव्हा आयोग त्यांना एक पक्ष म्हणून मान्यता देऊ शकते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.