Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी
    जळगाव

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 26, 2026Updated:February 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये पूर्वीप्रमाणे ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केली आहे.


    यासंदर्भात त्या उद्या मा. महापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव आणि वॉर्डनिहाय कामांचा स्पष्ट लेखाजोखा नागरिकांसमोर येण्यासाठी ही योजना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


    निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये करण्यात आलेल्या मागणीनुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत महानगरपालिकेमार्फत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात होणाऱ्या फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन संबंधित नगरसेवकांचीही स्वाक्षरी घेतली जात असे.


    या पद्धतीमुळे वॉर्डात प्रत्यक्षात कोणती कामे झाली, याची अधिकृत व पारदर्शक माहिती नागरिक आणि लोकप्रतिनिधींना मिळत होती. परिणामी कामांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढली होती आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ झाला होता. तसेच अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांवर तत्काळ लक्ष देणे शक्य होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


    सध्या अशा प्रकारची नोंद पद्धत अस्तित्वात नसल्यामुळे अनेकदा कामे झाली किंवा नाहीत याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे सौ. पाटील यांनी स्पष्ट केले. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्यासाठी तसेच प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.


    यासंदर्भातील निवेदन उद्या मा. महापौर यांच्यासह मा. आयुक्त आणि मा. उपमहापौर यांना माहितीस्तव सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवेदनानंतर महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि कोणता निर्णय जाहीर करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.