Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खा.मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाची रिक्षाला धडक !
    क्राईम

    खा.मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाची रिक्षाला धडक !

    editor deskBy editor deskFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दिल्ली येथील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिस एस्कॉर्ट वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील आठ जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता मेहरुण तलावाजवळील नेहरू नगर परिसरात घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार मनोज तिवारी हे पा-रोळा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने जिल्हा पोलिस दलातर्फे एस्कॉर्ट वाहन देण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगर हद्दीत सोडून देऊन हे पोलिस वाहन जळगावकडे परत येत असताना हा अपघात झाला.

    मेहरुण तलावाजवळील नेहरू नगर परिसरात रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हे वाहन समोरून येणाऱ्या रिक्षावर जाऊन आदळले. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून पोलिस एस्कॉर्ट वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ज्योती एकनाथ बारी (४५), एकनाथ रामदास बारी (५०), अश्विनी शुभम कुमावत (२५), रत्ना शंकर मिस्तरी (४८), सुशीला दिलीप बारी (५५), कीर्ती शिवाजी बारी (४०), कुणाल शिवाजी बारी (१३) आणि चार वर्षांची चिमुकली प्रियांशी शुभम कुमावत हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील रहिवासी आहेत.

    अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जखमींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यांची दुरवस्था व जीवघेणे खड्डे हेच अपघातास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या खराब स्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.