Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे वाटोळे; काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल
    राजकारण

    निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे वाटोळे; काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

    editor deskBy editor deskJanuary 31, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    “निवडणूक जिंकण्यासाठी रेवड्या वाटल्या जात असून त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता केवळ सत्तेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावर महसुली तुटीचा बोजा सातत्याने वाढत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या लोकानुनयी योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीत गेला आहे. २९ जानेवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील आर्थिक सर्वेक्षणातही महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर या योजनांचा नकारात्मक परिणाम झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

    ते पुढे म्हणाले की, लोकानुनयी योजना आणि वाढता कर्जबोजा यामुळे राज्य सरकारचे जमा-खर्चाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. याचा फटका चालू आर्थिक वर्षातील विविध विकासकामांच्या तरतुदींना बसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना जाहीर करून निवडणुका जिंकल्या जातात, मात्र यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, असा सवालही त्यांनी केला.

    निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असताना तो ती घेऊ शकत नाही. उलट तो सरकारच्या हातातील खेळणे बनल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    याचबरोबर त्यांनी घटनात्मक पदांबाबतही सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असताना ते रिकामे ठेवण्याचा अधिकार कुणाला आहे, यावर संशोधन करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नसतानाही दोन उपमुख्यमंत्री नेमले जातात, हेही त्यांनी अधोरेखित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर शरद पवार असमाधानी; ‘इतकी घाई का?’

    January 31, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026

    महिलांच्या आरोग्याचा नवा अध्याय; राज्यभरात मेनोपॉज क्लिनिक

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.