Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
    कृषी

    खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

    editor deskBy editor deskMay 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील शेतकरी हा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे.

    मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खरीप हंगाम 2025 च्या आढावा बैठकीमध्ये, निविष्ठांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसंदर्भात शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले. त्यानुसार, कृषि आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
    या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. WhatsApp क्रमांक: 9822446655, टोल फ्री क्रमांक: 18002334000 , ई-मेल: controlroom.qc.maharashtra@gmail.com निविष्ठांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिंकींग यासारख्या बाबींवर आधारित तक्रारी या माध्यमांद्वारे नोंदवता येतील. तक्रारी नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा. ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो WhatsApp किंवा ई-मेलवर पाठविल्यास तक्रारीचे निराकरण करण्यात अधिक सुसूत्रता येईल. ज्या शेतकऱ्यांना WhatsApp वापरणे शक्य नाही त्यांनी वरील क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. नियंत्रण कक्ष दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत राहील.
    शेतकऱ्यांनी या सेवांचा लाभ घेऊन खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण तापले; आणखी कारवाईची शक्यता

    January 24, 2026

    आव्हाणे येथील हाणामारीत तरुणाचा मृत्यू; मुख्य आरोपी अटकेत

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.