मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच राज्यातील मराठी अभिनेते श्रेयस तळपदेचा आगामी चित्रपट कर्तम भुगतमची चर्चा होत असताना त्याने एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. निवडणुकीच्या वलयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या राजकीय परिस्थितीत मोदी निवडून येण्यासारखे वातावरण असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे. विचारलेल्या प्रश्नावर श्रेयसने उत्तम उत्तर दिल्याने त्याची चर्चा होताना दिसतेय.
श्रेयस तळपदे काय म्हणाला?
श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितले की, “सध्या देशातील राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. त्यांचं मला विशेष कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशात विकासकामे करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील.”



