Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची ; प्रियंका गांधी
    राजकारण

    संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची ; प्रियंका गांधी

    editor deskBy editor deskApril 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    मागच्या दहा वर्षांत देशातील अनेक घटना पाहता लोकशाहीसाठी घातक आहेत. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार विकत घेतले गेले. संविधानाच्या विरोधात अनेक घटना बघायला मिळत आहेत. भारताच्या लोकशाहीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. परंतु, भाजप नेते, मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय लोकशाही कमजोर करण्यासाठी संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची असल्याचे ‘दावे के साथ कहती हूँ’ असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला.

    लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख, वैशाली देशमुख, माजी मंत्री विनायक पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे, बसराज पाटील नागराळकर उपस्थित होते.

    यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या सत्तेतील कार्यपद्धतीवर आणि वाढलेली महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर बोलताना प्रखर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर मात्र जीएसटी लादून त्यांना कर्जाच्या खाईत लोटले. मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे दिवस आंदोलन केले. शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले. मात्र पंतप्रधान मोदींनी या शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.