Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रवींद्र भैय्या पाटील यांची उमेदवारी कट करण्यामागील पडद्याआडचे गेम
    राजकारण

    रवींद्र भैय्या पाटील यांची उमेदवारी कट करण्यामागील पडद्याआडचे गेम

    editor deskBy editor deskApril 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : विजय पाटील

    देशाचे नेते शरद चंद्र पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील यांना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असताना त्यांची उमेदवारी कट करण्यासाठी फार मोठे राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी हे षड्यंत्र उघडकीस आणलं परंतु त्यांचे बंड हे म्यान झाले आहे. परंतु निष्ठावंत रवींद्र भैयांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही संबंध नसलेले श्रीरामाला ही उमेदवारी दिली गेली यामुळे बोदवड मुक्ताईनगर तालुक्यात असंतोष पसरला आहे.

    राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रवींद्र भैय्यांसाठी सुरुवातीला मेहनत घेतली त्यानंतर काही बाजारू लोकांना श्रीराम गवसला आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. फैजपुर मधील अन्वर मार्फत ठाण्यात हा कट शिजला त्यानंतर मुक्ताईनगर मधील तिघांना भले मोठे वजनदार कागदी लिफाफा दिला गेला. प्रदेश पातळीवर देखील रसद पुरवली गेली. यावल येथील भैया साहेबांचा निष्ठावंत देखील फुटला तो मुंबईला भैया साहेबांसाठी गेला आणि मध्ये श्रीरामाचे नाव सांगितले. अशा अनेक सुरस राजकीय कहाण्या पुढे येत आहेत. चोपडाच्या बाबाने देखील नेहमीप्रमाणे भाजपला मदत व्हावी यासाठी श्री राम पुढे केला. कारण चोपड्याच्या बाबांना साहेबांनी काही नाही दिलं परंतु ते लोकसभेला जय श्रीराम करतात. रावेर येथील भक्त सोपान त्यांनी भैय्यासाहेबांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले परंतु घरच पोखरले गेले असल्यामुळे प्रयत्न निष्पर ठरले. तसेच जिल्ह्यातील काही नेत्यांनी देखील भैय्या साहेबांचे नाव पुढे केले आणि कोपऱ्यात श्रीराम योग्य कसा आहे याची राजकीय मांडणी केली. मुक्ताई भक्त भैय्यासाहेबांचा राजकीय घात जवळच्यांनीच केला. रावेरचे काँग्रेसचे नेते ही जबाबदार तेवढेच आहेत. या राजकीय खेडीमध्ये भैया साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि स्वतःचे खिसे फुल भरले असा प्रकार या मतदारसंघात झाला असल्याची चर्चा रंगली आहे. बोदवड व मुक्ताईनगर मध्ये आसंतोष निर्माण झाला असून यामुळे चांगलाच फटका बसणार आहे असे चित्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025

    ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई आमचीच : ठाकरेंच्या विधानाने चर्चेला उधान !

    November 15, 2025

    “जो जीता वही सिकंदर : फडणवीसांचा शरद पवारांना करारा टोला !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.