Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वाळूच्या ट्रॅक्टरची रिक्षाला धडक ; रिक्षाचालकाचे प्राण वाचले
    क्राईम

    जळगावात वाळूच्या ट्रॅक्टरची रिक्षाला धडक ; रिक्षाचालकाचे प्राण वाचले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 23, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा प्रशासनाच्या ऊन गड व गलथान कारभाराची जिवंत उदाहरण आज भररस्त्यात पाहावयास मिळाले कागदोपत्री  वाळूचा व्यवसाय बंद आहे मात्र गिरणा नदीच्या पात्रातून अंदाधुंद वाळूचा उपसा अवैध मार्गाने करण्यात येत आहे भरदिवसा शहरातून या वाळूची वाहतूक बिनधास्तपणे करीत आहे यातच आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने धावत असणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. यात मात्र कोणाचाही जीव गेला नाही ही भाग्याची गोष्ट आहे यावर जिल्हा प्रशासन कोणावर आळा घालणार हे पाहणे योग्य राहील.

    या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाळूची वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षेला शिव कॉलनी येथे धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ट्रॅक्टरच्या धुडाची पुढील दोन्ही चाके ही रिक्षात रूतून बसली. या रिक्षेचा चालक हा रिक्षातून उतरून समोर उभा असल्याने त्याला यात इजा झाली नाही. मात्र भर चौकात घडलेल्या या अपघाताने प्रचंड खळबळ उडाली. संंबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटना स्थळावरून पलायन केले.

    वाळूचा सुप्त कागदोपत्री बंद आहे असे असले तरीही गिरणा पात्रातून दिवसाच नवे रात्रीही डंपर ट्रॅक्टर्स या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे वही वाहतूक भर शहरातून होत असून सुद्धा पोलीस प्रशासन परिवहन विभाग किंवा महसूल विभाग याकडे कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही आहेयातूनच हा अपघात घडल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

    अवैध वाहतूक व्यवसायाच्या वाहनांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे आतातरी प्रशासनाने खडबडून जागे होऊन अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.