Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबई येथे जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ पुस्तकाचे प्रकाशन
    जळगाव

    मुंबई येथे जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ पुस्तकाचे प्रकाशन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव/धुळे/नंदुरबार : महावितरणच्या लातूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे लिखित ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड मुंबई येथे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विजय सिंघल यांच्यासह संचालक (संचालन), संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रविंद्र सावंत, संचालक (प्रकल्प / मानव संसाधन) भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मुख्य महाव्यवस्थापक (तां.आ.) भरत जाडकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे हे उपस्थित होते. डॉ. मोहन दिवटे यांनी लिहिलेले ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ हे पुस्तक मुक्तरंग प्रकाशन लातूरतर्फे प्रकाशित करण्यात आले असून सदर पुस्तकास महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी आणि भारताचे माजी गृहमंत्री व पंजाब राज्याचे माजी राज्यपाल श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रस्तावना आहे. या पुस्तकातून प्रारंभिक काळातील माध्यमसृष्टी, भारतीय माध्यमव्यवस्था, मराठी वृत्तपत्रसृष्टी, जनसंपर्क, महावितरणमधील जनसंपर्कविषयक चांगले उपक्रम आणि माध्यमांची भूमिका इत्यादी घटकांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.
    चांगली साहित्यकृती हे जनसंपर्काचे उत्तम साधन आहे, असे सांगतानाच डॉ. दिवटे यांनी लिहिलेले हे पुस्तक जनसंपर्काचा आदर्श नमुना आहे. त्यातून महावितरणच्या चांगल्या कार्यक्रमाची समाजाला ओळख होईल. महावितरणची प्रतिमा जनमानसात उजळली जाईल. भविष्यात अशीच चांगली साहित्यकृती डॉ. दिवटे यांच्याकडून निर्माण व्हावी, अशी अपेक्षा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क विभागाचे राहुल नाईक व इतरांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.