Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटील झाले भावूक : मतदार संघात निधन झाल्याने कार्यक्रम रद्द !
    धरणगाव

    पालकमंत्री पाटील झाले भावूक : मतदार संघात निधन झाल्याने कार्यक्रम रद्द !

    editor deskBy editor deskApril 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    राज्यात शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु असतांना राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात विकासकामाचे भूमिपूजन असो वा लोकार्पण असो असे अनेक कार्यक्रम सुरु आहे. तसेच कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विकासाची गंगा गावागावापर्यत पोहचविण्यात व्यस्त आहे. धरणगाव तालुक्यातील भोणे या गावी आज विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गावातील एका कुटुंबावर शोककळा पसरल्याने हा कार्यक्रम मंत्री पाटील यांनी रद्द केला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामधील भोणे यागावातील जलजीवन मिशन अंतर्गत, अत्याधुनिक फर्निचर, व्यायाम शाळा, कॉक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, सभा मंडप, यासह विविध विकास कामाचे आज भूमिपूजन असतांना अचानक गावतील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे शिक्षक मधूकर पोपट फुलपगारे यांची पत्नी योगिता फुलपगारे यांचे दुखद निधन झाल्याने हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामाध्यमातून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धरणगाव तालुका म्हणजे गुलाबराव पाटील यांचा एक परिवार आहे अन परीवारातील जर सदस्य दुखात असतो त्यावेळेस आपण कोणताही आनंद साजरा करू शकत नाही तर त्याच्या दुखात सहभागी होवून १० दिवसाचे सुतक ठेवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी सहभागी होताना दिसत असतात अशी चर्चा देखील धरणगाव तालुक्यातील प्रत्येक चौका-चौकात ऐकायल मिळत आहे.

    मतदार संघातील प्रत्येक घर हे माझे कुटुंब आहे. त्यांच्या सुखात दुखात मी नेहमी सहभागी असतो व आपल्या घरात जर दुख घटना झाल्यावर आपण भूमिपूजन करत बसणे मला योग्य वाटत नाही मला आधी माझ्या परिवारातील माणस महत्वाची आहे. ते भूमिपूजन नंतर होतच बसेल पण जो धक्का फुलपगारे परिवाराला लागला आहे. आज त्यांना माझ्या आधाराची गरज आहे. आणि मी त्यांच्यासोबत असणार आहे.
    – ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.