• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाच्या नेत्याची जोरदार टीका ; ठाकरेंनी राष्ट्रवादीकडे…

editor desk by editor desk
January 13, 2023
in राजकारण, राज्य
0
शिंदे गटाच्या नेत्याची जोरदार टीका ; ठाकरेंनी राष्ट्रवादीकडे…

मुंबई : वृत्तसंस्था 

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षचिन्हाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना नक्की न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, यावर निकाल देताना एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे. असे मत यावेळी बोलताना रामदास कदम यांनी व्यक्त केले.

ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. जी काही अक्कल ती ठाकरेंनाच, आम्ही सगळे बेअक्कल आहोत. असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे कुटुंबावर केला. ‘बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं, शून्यातन उभं केलं. शून्यातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली. ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना’ या घोषवाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला जन्म दिला आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर मोठी केली. ती हिंदुत्ववादी शिवसेना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि सोनिया गांधींबरोबर गहाण ठेवली.’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात बोलताना मान्य केलं की, शिवसेना ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे देखील यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले. त्यांनी शिवसेना शरद पवारांकडे गहान ठेवली आहे. आम्ही भाजपात प्रवेश करू पण मरेपर्यंत भगवा झेंडा सोडणार नाही.’ असा इशारा देखील यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाला दिला. त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करत आहेत. त्यात ते जेवढे बोलत आहेत, तेवढा त्यांचा पक्ष कमी होत आहे. त्यामुळे त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे हे आता आपण ठरवायचे आहे. सुप्रीम कोर्टातील निकाल आल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल त्यांच्या जवळचे अनिल परब त्यांना किती फसवत आहेत.’ असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला.

Previous Post

दिपाली सय्यद उर्फीवर आक्रमक ; तिला रस्त्यावर येऊन…

Next Post

व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group