• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुण-तरुणीने केली एकाच घरात आत्महत्या ; बुधवार पेठेत झाली होती ओळख !

editor desk by editor desk
December 28, 2022
in क्राईम, राज्य
0
तरुण-तरुणीने केली एकाच घरात आत्महत्या ; बुधवार पेठेत झाली होती ओळख !

पुणे : वृत्तसंस्था 

पुण्यातील एका परिसरात एका महिलेने व तरुणाने एकाच घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय बरखा मंडल आणि 31 वर्षीय राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. कात्रज परिसरात ही घडना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा मंडल आणि राजू फारुख शेख या दोघांनीही एकाच घरात आत्महत्या केली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही आहे. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात आलं नव्हतं. या घराचा दिवसभर दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा ठोकून आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही आतून कोणी दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी ताबडतोब भारती विद्यापीठ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली. राजूने घराच्या हॉलमध्ये तर बरखाने घराच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांना आढळलं.

बरखा ही मुळची पश्चिम बंगालची आहे. राजू हा पुण्याचा आहे. दोघांचीही पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत ओळख झाली होती बरखा हिची मुले आणि पती आहेत. ते तिघेही मागील अनेक वर्षांपासून पश्चिम बंगामध्येच राहतात. चार दिवसांपूर्वीच भाड्याने घेतलेल्या रुममध्ये दोघांत काय घडलं आणि आत्महत्येचं नेमकं कारण काय असेल? याचा पोलीस शोध घेत आहे.

बरखा आणि राजू यांच्या आत्महत्येनंतर दोघांचेही मोबाईल भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या मोबाईलचा तपास पोलीस करत आहे. या मोबाईलमधून आत्महत्येचं कारण समोर येईल का? हे बघावं लागणार आहे. या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरमालकांनी अॅग्रीमेट केलं नसल्यामुळे दोघांबाबतही अधिक माहिती मिळत नाही आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अनेकांनी या घटनेची धास्ती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

अमळनेरात शस्त्र घेवून फिरणाऱ्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली

Next Post
पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली

पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group