• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही ; संजय राऊत आक्रमक !

editor desk by editor desk
December 17, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही ; संजय राऊत आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था 

महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, आजच्या महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकणार नाही. हे सरकार उलथवून टाकू.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आज हिंदू संघटनांनी ठाणे बंद पुकारला आहे. त्याला भाजप व शिंदे गटानेही पाठिंबा दिला आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीच आपले शहर बंद करण्याचा हा प्रकार मी प्रथमच पाहत आहे. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते आहात. विचाराला विचारांनी विरोध केला पाहीजे. आपलेच शहर काय बंद करताय?

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणेच ते बंद करत आहे. खरतर त्यांची ऐवढीच ऐपत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे शहर बंद करण्याचा आदेश देताय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत बसताय. हे लाचार सरकार आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाबद्दल संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाविरोधात खरे तर महाराष्ट्र बंद करायला हवा. पण, आज आम्ही मोर्चा काढून आमचा निषेध नोंदवत आहोत. हा मोर्चा भव्यदिव्य असा होणार आहे. पण, या महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्चालाच सरकारने जाचक अटी लादल्या आहेत.

Previous Post

पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !

Next Post

मोठी बातमी : जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

Next Post
मोठी बातमी : जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

मोठी बातमी : जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group