• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सीमावाद प्रकरणातील मास्टरमाइंड शोधा ; पवारांची मागणी !

editor desk by editor desk
December 15, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
सीमावाद प्रकरणातील मास्टरमाइंड शोधा ; पवारांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघातही त्यांनी केला. सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत केली आहे.

अजित पवार म्हणाले की, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का घडले, असा विरोध का आणि आंदोलन का झाले? यात जाणीपूर्वक कोणी ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या भावनांचा उद्रेक झाला. उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सारे समोर आले पाहिजे. आता काही जणांना असे वाटते की, हे कोणीतरी विरोधकांनी केले. अशी संशयाची सुई घेतली जाते. मात्र, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कधीही राज्याच्या आणि देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कुठलिही चुकीची गोष्ट आम्हा लोकांकडून कदापिही घडणार नाही. हा सातत्याने दृष्टिकोन आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष ठेवत असतो, तरी पण कुठली शंका-कुशंका केंद्र सरकारला वाटत असेल, दोन राज्यातल्या प्रमुखांना वाटत असेल, तर त्यातले दूध का दूध आणि पानी का पानी पुढे आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, कशामुळे हे निर्माण झाले. सगळे सुरळित सुरू होते. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? बोम्मई साहेबांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केले नसते, तर बरे झाले असते. आपण राज्याची निर्मिती झाल्यापासून निपाणी, बेळगाव कारवार मागतोय. त्यांनी त्यासंबंधी वक्तव्य केले. नंतर जत संबंधी वक्तव्य केले. त्यातून बोम्मई महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करतायत. अशी भावना महाराष्ट्र वासियांच्या आणि सीमावासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे हे सारे घडले. कर्नाटक सीमावादासंदर्भात अनेकदा समित्या नेमल्या गेल्या. अनेकदा आंदोलने झाली. अनेकदा चर्चा झाल्या. मला आठवतेय पाठीमागच्या काळात वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. मात्र,आता राज्य सरकारने आक्रमक होत खमकेपणाने भूमिका मांडावी. महाराष्ट्राच्या बाजून वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Previous Post

जळगावात प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

Next Post

शाहरुखचा पठाण सापडणार वादात ; संघटनांनी व्यक्त केला संताप !

Next Post
शाहरुखचा पठाण सापडणार वादात ; संघटनांनी व्यक्त केला संताप !

शाहरुखचा पठाण सापडणार वादात ; संघटनांनी व्यक्त केला संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group