• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ; बंगल्यांची होणार चौकशी !

editor desk by editor desk
December 13, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ; बंगल्यांची होणार चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

विशेष म्हणजे गौरी भिडे नावाच्या महिलेने ठाकरे कुटुंबावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला ठाकरे कुटुंबीयांनी विरोध केला आहे. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र आता सोमय्या यांनी 19 बंगल्यांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ केली आहे.
तेव्हाचे ठाकरे सरकारने आपल्या पदाचा, अधिकारांचा दुरुपयोग करुन शासकीय नोंदींमध्ये व दस्तऐवजांमध्ये खाडाखोड आणि फेरफार केले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करावा. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. ते पुढे म्हटले आहे की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा चौकशी व कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे. हा घोटाळा झाला असल्याचे प्रशासनाने आत्ता मान्य केले आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. हे प्रकरण पीएसीएल घोटाळ्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने आगोदर प्रवीण राऊतला अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. सीबीआयचा आरोप आहे की, पीएसीएल प्रकरणात गुंतवणूकदारांकडून 49,100 कोटी रुपये गोळा करण्यात आले आणि नंतर हा घोटाळा करण्यात आला. पत्राचाळ घोटाळ्यात जामिनावर सुटलेले संजय राऊत सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळेच प्रवीण राऊत यांच्यामार्फत केंद्रीय एजन्सीने त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Previous Post

तरुणाच्या खून प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात !

Next Post

वकील सदावर्ते केली मागणी : उदयनराजेंना अटक करा !

Next Post
वकील सदावर्ते केली मागणी : उदयनराजेंना अटक करा !

वकील सदावर्ते केली मागणी : उदयनराजेंना अटक करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group