• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गट संपविण्यासाठी हे नेते कार्यरत ; दीपक केसरकर !

editor desk by editor desk
December 9, 2022
in राजकारण, राज्य
0
ठाकरे गट संपविण्यासाठी हे नेते कार्यरत ; दीपक केसरकर !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाची यात्रेची जबाबदारी नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे असतांना ते राज्यभर बाळासाहेबांचे विचार मांडत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आता अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले कि, राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे, यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांना बोलता येतं. काही लोकांना कृती करता येते. ज्यांनी सीमा भागाच्या सुविधा बंद करून ठेवल्या होत्या, त्यांना असं बोलणं शोभत नाही. आम्ही सुविधा सुरू केल्याच, पण कोर्टातल्या केसलाही गती दिली. सीमाभागाचं राजकारण पेटवून राजकारण करणाऱ्यांचा महाराष्ट्रानं विचार करण्याची गरज, असं दीपक केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी सीमावादाच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झालं असतं. तुम्ही साध्या मिटिंग घेतल्या नाहीत. आरोप करणं सोपं असतं. राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असते, असा टोला त्यांनी लगावला.

खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या भूमीत छत्रपतींचा अपमान योग्य नाही. राज्यपालांनी खुलासा द्यायला हवा होता, पण दिला नाही. आम्ही केंद्राकडे भावना पोहोचवल्या आहेत. सरकार बंधन आणू शकत नाही, असंही ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीय. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हिमाचल प्रदेशात दर 5 वर्षांनी सरकार बदलत हा रेकॉर्ड आहे. दिल्लीत बदल घडला. कामं केली नाही की बदल होतो, हा मेसेज आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपची युती होईल, असं ते म्हणाले.

Previous Post

मी जिच्यावर प्रेम केले तिने दुसऱ्यावर प्रेम केलं म्हणत तरुणाने संपविले आयुष्य !

Next Post

पदवीधर मतदार संघ निवडणूक संदर्भात गुलाबराव देवकर यांच्याशी थोरात, डॉ‌. तांबे यांची चर्चा !

Next Post

पदवीधर मतदार संघ निवडणूक संदर्भात गुलाबराव देवकर यांच्याशी थोरात, डॉ‌. तांबे यांची चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group