• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नाशिक विभागात १ हजार ३५ पदावर होणार तलाठी भरती !

editor desk by editor desk
December 2, 2022
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
नाशिक विभागात १ हजार ३५ पदावर होणार तलाठी भरती !

मुंबई : वृत्तसंस्था 

अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत. रिक्त पदांसह नव्याने पुनर्रचित सजा वाढ झाल्याने राज्यात चार हजार १२२ पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यात १२ हजार ६२६ तलाठी पदे मंजूर असून, त्यातील आठ हजार ५७४ पदे स्थायी असून, चार हजार ६२ पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. ग्रामपातळीवर प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी संबंध येत असतो. सात-बारा, उत्पन्न, शेतीविषयक दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते.

दोन वर्षांपूर्वीची एक हजार १२ पदे रिक्त असून, गाव परिसरातील मोठ्या गावांमुळे वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन पुनर्रचित सजानिर्मिती करण्यात आली. यामुळे नव्याने तीन हजार ११० पदे भरली जाणार असल्याने तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून, यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल. शिधापत्रिकांची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत व सहाय्यता करणे, कायदा सुव्यवस्थेच्या वेळी कामे करणे, कृषिगणना करणे अशी वेगवेगळी कामे करावी लागतात. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास ‘सजा’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे एक ते तीन गावांच्या समूहास एक तलाठी असतो. राज्यातील सर्व गावांची दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने विभागनिहाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी महसूल उपायुक्तांना देण्यात आली असून, ‘समन्वय अधिकारी’ म्हणून त्यांची नियुक्ती दिली आहे.

पंधरा दिवसांत माहिती पाठविण्याचे आवाहन
तलाठी भरतीसाठी सामाजिक प्रवर्गनिहाय किती पदे असतील, याचा आराखडा, विविध संवर्गासह सर्वसाधारण पदे, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, पदवीधर अंशकालीन, अनाथ याप्रमाणे पदांचे आरक्षण, टक्केवारीचा प्रमाण तक्ता पंधरा दिवसांत अद्ययावत पाठवावा, असे २९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. नाशिक विभागात एक हजार ३५, औरंगाबाद- ८४७, कोकण- ७३१, नागपूर- ५८०, अमरावती- १८३, तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण चार हजार १२२ पदांचा या महाभरतीत समावेश आहे.

Previous Post

आज तुम्हाला नवीन मित्र भेटतील ; आजचे राशिभविष्य

Next Post

फिट राहण्यासाठी हिवाळ्यात करा हे पाच उपाय !

Next Post
फिट राहण्यासाठी हिवाळ्यात करा हे पाच उपाय !

फिट राहण्यासाठी हिवाळ्यात करा हे पाच उपाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group