• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

editor desk by editor desk
November 26, 2022
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था 

सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांच्यासह ५० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो फेडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह निघाले आहेत. विशेष विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचे दर्शन घेतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदार, खासदारांना घेऊन आज पुन्हा गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीला हे आमदार, खासदार कुटुंबासह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मुंबई विमानतळावरून शिंदे गट रवाना झाला असून थोड्याच वेळात गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना कामाख्यादेवीकडे करणार आहोत. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.

तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुवाहटीवरून परतताना जास्त आमदार घेऊन येऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गट या दौऱ्यात ठाकरे गटाला आणखी काही धक्का देणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता श्रद्धेने जात आहोत. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असे वाटत नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सर्व आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

सरकारची जीभ दिल्लीला गहान ठेवलीय का? राऊत यांचा सवाल !

Next Post

राज्यपाल पुन्हा वादात : शहिदांना चप्पल घालून अभिवादन !

Next Post
राज्यपाल पुन्हा वादात : शहिदांना चप्पल घालून अभिवादन !

राज्यपाल पुन्हा वादात : शहिदांना चप्पल घालून अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group