• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

“संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी ; विरोधी पक्षनेते दानवे

editor desk by editor desk
November 4, 2022
in जळगाव, धरणगाव
0
“संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी ; विरोधी पक्षनेते दानवे

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली.

जळगांव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातगंगापुरी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यात अंबादास दानवे म्हणाले की, “संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. सरकारमध्ये नसल्याने तुम्हाला देण्यासाठी आमच्या हाती काही नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कर्जमुक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली होती. मात्र आताही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तातडीची नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतीचे पंचनामे लगेच झाले पाहिजेत. नेते आणि मंत्र्यांनी नुकसानग्रस्त परिसरात दौरे करायला हवेत आणि शेतकऱ्यांना आपल्यासाठी राबणाऱ्या बळीराज्याला आपलं सरकार आहे, असं वाटलं पाहिजे.”

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज धरणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहीती घेतली. तसेच सरसगट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. दिवाळी आनंदी शिधा ही योजना नियोजनअभावी फसली असून अनेकांना आजही शिधा मिळाली नसल्याची तक्रार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांपासून बैठक घेतली नसल्याची बाब देखील श्री. दानवे यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, धरणगावचा पाणी पुरवठा विषयी तर गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. यावेळी विष्णू भंगाळे, अॅड.शरद माळी, धीरेंद्र पुरभे, भागवत चौधरी बापू महाजन चेतन जाधव राहुल रोकडे योगेश वाघ, जानकीराम पाटील,विनोद रोकडे जयेश माळी सह शेतकरी उपस्थित उपस्थित होते.

Previous Post

तिचा फोन उचलताच कपडे काढते आणि ब्लकमेल करते

Next Post

बापरे ! : गांजाच्या शेतात पोलीसांचा छापा; ६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

बापरे ! : गांजाच्या शेतात पोलीसांचा छापा; ६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group