• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात ७ रोजी ‘भारत जोडो यात्रा’ ; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

editor desk by editor desk
November 2, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
राज्यात ७ रोजी ‘भारत जोडो यात्रा’ ; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

मुंबई : वृत्तसंस्था 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. १० नोव्हेंबर रोजी यात्रेचे नांदेड शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चव्हाण म्हणाले, एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. बेरोजगारी, महागाई, दडपशाहीसारख्या मुद्द्यांवर लोक स्वतःहून आपल्या व्यथा राहुलजींकडे मांडत आहेत. सर्वसामान्यांत यात्रेबद्दल प्रचंड उत्सुकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीच ही यात्रा नाही तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचा या यात्रेत सहभाग आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता “मी पण चालणार’ हे घोषवाक्य आम्ही तयार केले आहे. ८ नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमध्ये मुक्कामी येणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी नायगाव येथे ते पदयात्रेत सहभागी होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही यात्रेत सहभागी होण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. लोकचळवळ निर्माण करण्याचा यात्रेचा हेतू असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मी करत आहे. वकील, डाॅक्टर यांच्यासह समाजसेविका मेधा पाटकर यादेखील “भारत जोडो’शी जोडल्या जाणार आहेत.

१२० किलोमीटरची पदयात्रा नांदेड जिल्ह्यात यात्रेचा चार दिवस मुक्काम असेल. पदयात्रेनंतर काॅर्नर मीटिंगदेखील होतील. १० नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात १२० किमी ही पदयात्रा असेल. राज्यात या यात्रेचा मार्ग तीनशे किमी आहे. हिंगोलीत चार दिवस यात्रेचा मुक्काम राहणार असून यादरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत. पैकी एक नांदेडमध्ये तर दुसरी शेगावला. दररोज २४ किलोमीटरची यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. १२ किलोमीटरनंतर विश्रांती आणि नंतर दुपारी साडेतीन ते सात असा कार्यक्रम असेले.

Previous Post

तुम्हाला माहित आहे का ? रक्तदान केल्याने काय आहे फायदा ?

Next Post

४५ हजार महिलांना मिळणार रोजगार ; टाटा समूहाची घोषणा

Next Post
४५ हजार महिलांना मिळणार रोजगार ; टाटा समूहाची घोषणा

४५ हजार महिलांना मिळणार रोजगार ; टाटा समूहाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

दुचाकीवरून दारू घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

July 7, 2025
जिल्हा कारागृहात कैदीने केली कर्मचाऱ्यास मारहाण !
क्राईम

जिल्हा कारागृहात कैदीने केली कर्मचाऱ्यास मारहाण !

July 7, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात यश मिळणार !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group