• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात पावसाची संततधार, प्रकल्पपातळीत वाढ

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 7, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात पावसाची संततधार, प्रकल्पपातळीत वाढ

बहुळा ९, हतनूर ६ तर बोरी प्रकल्पाचे ७ गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने मध्यम लघूप्रकल्प पातळीत बर्‍याच प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.  गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात तीन दिवसांपूर्वी केवळ २६ टक्के जलसाठा होता. त्यात तब्बल ६७ टक्क्याहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ९३.१० टक्के जलसाठा असून प्रकल्पाचे ९ गेट १० सेमी ने उघडून ३०५५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग बहुळा प्रकल्पातून केला जात आहे. तर तापी नदी तसेच हतनूर प्रकल्पाचे ४ गेट पूर्ण तर २ गेट २ मिटरने उघडून २८हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती प्रकल्प अभियंत्यांनी दिली.
गत सप्ताहात चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीमुळे तितूर डोंगरी वा मांजरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होउन अतोनात नुकसान झाले असून दोन दिवसांपासून पुन्हा चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्प वगळता हतनूर, हिवरा, बहुळा, बोरी, मन्याड आदी प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी गिरणेच्या उपनद्यांच्या नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे गिरणा पात्राची पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळेे जिल्ह्यातील गिरणासह अन्य नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी केले आहे. 
जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.  गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात तीन दिवसांपूर्वी केवळ २६ टक्के जलसाठा होता. त्यात तब्बल ६७ टक्क्याहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ९३.१० टक्के जलसाठा असून प्रकल्पाचे ९ गेट १० से.मी.ने उघडून ३०५५ क्यूसेक तर बोरी प्रकल्पाचे ५ गेट ०.३० मीटर व २ गेट ०.१० मीटरने उघडून ५१५५ तसेच मन्याड प्रकल्प सांडव्यातून १२७६ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तसेच चाळीसगाव तालुक्यातील तितूर, डोंगरीसह अन्य नदीपात्रात पाण्याची आवक वाढ झाली आहे. परिणामी गिरणा नदीपात्राची पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा, तापी, बोरी आदी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
सायंकाळनंतर हतनूर मधून विसर्गात वाढ होणार
तापी नदी तसेच हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात २९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून ६४.०८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे ४ गेट पूर्ण तर २ गेट २ मिटरने उघडून २८हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याच्या आवकेत सतत वाढ लक्षात घेता सायंकाळनंतर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्रकल्प अभियंता जळगाव यांनी म्हटले आहे.   
८१ टक्के पावसाची नोंद
जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतपिकांचे नुकसान देखिल झाले आहे. गेल्या २४ तासांत ११.३ मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यत १००.४ मि.मीसह ८१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त पारोळा २३.३, जळगाव ७.५, भुसावळ १२.५, यावल ११.९, रावेर १७.१, मुक्ताईनगर १४.७, अमळनेर ४.०, चोपडा २.३, एरंडोल १४.९, चाळीसगाव ६.७, जामनेर २१.५, पाचोरा ८.४, भडगांव ७.४, धरणगांव ९.९, आणि बोदवड १२.८ मि.मी.सह ११.३ मि.मी.नुसार आतापर्यत १००.४ मि.मी म्हणजेच ८१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Previous Post

जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

Next Post

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश !

Next Post
जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश !

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group