• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : पाच दिवसाचा आठवडा होणार रद्द ?

editor desk by editor desk
October 20, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : पाच दिवसाचा आठवडा होणार रद्द ?

मुंबई : वृत्तसंस्था

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्यण होण्याचे संकेत आहेत. यामुळे पूर्वीच्या धर्तीवरच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू राहणार असून, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयांना सुटी राहणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मान्य केली होती. यानुसार 5 दिवसांच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सरकारी कामे केली जात आहेत. तसेच शनिवार व रविवार असे दोन दिवस आठवडी सुटी आहे. परंतु, शनिवारी सुट्टी असल्याने कर्मचारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्यांमधून करण्यात येत होत्या. तसेच, त्यांच्या कार्यपध्दतीवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार ५ दिवसांचा आठवडा रद्द करण्याची शक्यता आहे. या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहितीही मिळत आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी मोठा दिलासा होता. दिवाळीपूर्वीच 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Previous Post

जे आमदार शिंदे सोबत गेले त्यांना पश्चताप होत आहे : जयंत पाटील

Next Post

जेवढी ताकद लावायची तेवढी लाव ; करुणा शर्मा

Next Post
जेवढी ताकद लावायची तेवढी लाव ; करुणा शर्मा

जेवढी ताकद लावायची तेवढी लाव ; करुणा शर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !
राजकारण

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !

July 20, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

धक्कादायक : विषप्राशन केलेल्या परसाडे येथील प्रौढाचा मृत्यू !

July 20, 2025
जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

July 20, 2025
नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!
क्राईम

नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

July 20, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

July 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील

July 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp