• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खडसेंनी यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे ; मंत्री महाजन

editor desk by editor desk
October 14, 2022
in धुळे, धुळे, राजकारण, राज्य
0
नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात वर्ग सूचना विमा कंपनीला द्या

धुळे : वृत्तसंस्था

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. ‘उद्धव ठाकरे हे कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार होते तर कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार असल्याचं सांगताय. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे सत्ता गेल्यानंतर ते आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाने गुदगुल्या करत आहे. सत्ता गेल्यामुळे आता या सर्व गंमतीजमती केल्या जात असल्याची टीका महाजन यांनी केली. ‘खडसेंनी यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी केलेले अनेक पराक्रम आता समोर येत आहेत. पक्षात जाती पातीच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे संधी दिली जाते, असे सांगत खडसेच्या टिकेला महाजनांनी उत्तर दिले आहे.

यावेळी त्यांनी ‘त्या’व्हायरल झालेल्या क्लिपबद्दल स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, ‘मला वाटतं खरं, प्रामुख्याने हा विषय माझा नाही. शिक्षक जरी भरायचे असले तरी जिल्हा परिषदमध्ये काम करतात. याबद्दलचा निर्णय हा शिक्षण खाते करत असतं. दीपक केसरकर हे त्या खात्याचे मंत्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा विषय छोटा आहे. कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. मी त्यांना सांगितलं की, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्षक कमी आहे, याबद्दल चर्चा झाली होती शिक्षण खात्याने याबद्दल मनावर घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ते दोन महिन्यात निर्णय घेणार असं आश्वासन दिलं आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे’ असं महाजन यांनी सांगितलं.

‘मागच्या सरकारच्या काळात या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता. याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हा विषय लवकरात लवकर, दोन ते तीन महिन्यात आम्हाला विषय मार्गी काढायचे आहे. शिक्षकांच्या भरती करायच्या आहे. त्या शिक्षकांची भरती कशी करायची याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा सुरू आहे, लवकरच यावर निर्णय होईल, असं आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिलं. तसंच, संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्राबद्दल महाजन यांनी बोचरी टीका केली आहे. ‘संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचीच अधिक चिंता दिसून येत आहे. कारागृहामध्ये मोबाईलची सुविधा नसल्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं असेल अशी उपासात्मक टीका महाजन यांनी केली.

Previous Post

Big Breking : हिमाचलची विधानसभा निवडणूक जाहीर

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधीला ‘स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न

Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधीला ‘स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न

पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधीला 'स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group