• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ऐन दिवाळीत जनता करणार महागाईचा फराळ

editor desk by editor desk
October 13, 2022
in आरोग्य, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
ऐन दिवाळीत जनता करणार महागाईचा फराळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काही दिवसावर येवून ठेपलेल्या दिवाळी सणाला यंदाहि जनतेला महागाई मधून सुटका होणार नसल्याचे चित्र आता तरी जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यातील महागाईचे दर बुधवारी केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार किरकोळ महागाई दर (सीपीआय) ७.४१ टक्क्यांवर गेला आहे. अॉगस्ट महिन्यात हा दर ७ टक्क्यांवर होता. एप्रिल महिन्यानंतर (७.७९ टक्के) हा दर सर्वात जास्त आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत हि जनतेला महागाईचा फराळ करावा लागणार आहे.
वाढत्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तरीही सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली आहे. महागाईचे दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेने ठेवले होते, परंतु सलग नवव्या महिन्यात हे उद्दिष्ट गाठता आले नाही. सप्टेंबर महिन्यात भाज्या १८ टक्के, मसाले १६.८, खाद्य व पेय पदार्थ ८.४१, चपला-बूट १२.३०, कपडे १०.१७ आणि इंधन व ऊर्जा १०.३९ टक्के महागले आहे. विशेष म्हणजे या काळात शहर आणि ग्रामीण भागातही अन्नपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. औद्योगिक उत्पादनात घट : औद्योगिक निर्मिती आणि खाणकाम क्षेत्रात उत्पादनात घट झाल्याने देशाचे औद्योगिक उत्पादन (आयआयपी) ऑगस्ट महिन्यात ०.८ टक्के घटले आहे. दीड वर्षातील हा नीचांक आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात औद्योगिक उत्पादन १३ टक्के वाढले होते, तर या वर्षी जुलै महिन्यात २.२ टक्के वाढ झाली होती.
रिझर्व्ह बँकेला द्यावे लागणार स्पष्टीकरण : महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने रिझर्व्ह बँकेला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. २ ते ६ टक्क्यांचे लक्ष्य का हुकले याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार आहे. दरम्यान, अमेरिकी मानांकन संस्था एस अँड पीने भारतात मार्चपर्यंत महागाईचे दर अधिक राहतील. मार्च २०२३ मध्ये ६.८ पर्यंत राहील तथापि २०२३-२४ या आर्थिक वर्षात ती ५, तर त्यानंतर २४-२५ मध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत आटोक्यात येऊ शकेल, असा अंदाज वर्तवला आहे.

Previous Post

तुळजापूर देवस्थानाला मिळाला कोटी रुपयांची देणगी

Next Post

रोझोदा परिसरातून दुचाकी लांबविली

Next Post
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

रोझोदा परिसरातून दुचाकी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group