• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

न्याय होणार आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे ; आदित्य ठाकरे

editor desk by editor desk
October 12, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जळगावात २० रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवं निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आयोगाने मंजूर केलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असं विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ हे नाव दोन्ही शिंदे गटाला मिळालं तर काय असा प्रश्न विचारण्यात आला.

शिंदे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची नावं निश्चित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी, “हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे. धनुष्यबाण चिन्हं बहुतमच्या आधारे आम्हाला मिळायला हवं होतं. आमच्याकडे ७० टक्के बहुतम आहे. आमचा चिन्ह आणि पक्षासंदर्भातील दावा कायम आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.

आदित्य काय म्हणाले?
आदित्य यांना ‘मुंबई तक’वरील विशेष मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेलं तरी तुमची लढण्याची तयारी आहे का? कारण निवडणूक आयोगाचा संपूर्ण निर्णय अद्याप लागलेला नाही. सध्या देण्यात आलेला निर्णय हा अंतरिम निर्णय आहे,” असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसंदर्भात आहे. न्याय होणार आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान आणि लोकशाहीबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटतं की फक्त देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे,” असं अदित्य म्हणाले.

Previous Post

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटलानी दिला ‘जय श्री राम’चा नारा

Next Post

जळगावातील महिलेवर अत्याचार

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगावातील महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !
राजकारण

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !

July 16, 2025
कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
कृषी

कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !

July 16, 2025
“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !
राजकारण

“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !

July 16, 2025
मोठी बातमी :  जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !
राजकारण

मोठी बातमी : जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !

July 16, 2025
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !

July 16, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जळगावात शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याने दोघांना लोखंडी पाईपने मारहाण !

July 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group