• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडणार

editor desk by editor desk
October 11, 2022
in जळगाव, सामाजिक
0
रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडणार

मुंबई : वृत्तसंस्था

रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळातील गर्दी बघता, गाड्यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

दिवाळी उत्सव पंधरा दिवसावर आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार. दिवाळीला शाळा, महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. यामुळे दिवाळीच्या वेळी कामानिमित्त अन्यत्र राहणारे कुटूंब उत्सवासाठी घरी जातात. सुट्ट्यांमध्ये दिवाळीनंतर नातेवाईकांच्या भेटीसाठी, पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवासासाठी नागरिकांची प्राथमिकता रेल्वेला असते. यामुळे दरम्यानच्या काळात रेल्वेवर प्रचंड गर्दी वाढते. हिच बाब लक्षात घेऊन 22 ऑक्टोबरपासून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

अमरावती – जबलपुर दरम्यान नुकतेच गाडीला सुरुवात झाली आहे. गाडी क्रमांक 12160 जबलपुर – नागपूर हि गाडी आता अमरावती स्टेशनपर्यंत व गाडी क्रमांक 12159 अमरावती – जबलपूर स्टेशन दरम्यान धावेल. सध्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक गाड्या बंद आहेत. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या दिलासा आहे.

मुंबई ते रिवा दरम्यान धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचा कालावधी 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर 02187 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल 27 ऑक्टोबरपर्यंत धावेल. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळा, थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
उत्सव काळात वाढविण्यात आलेल्या ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांची गर्दी प्रचंड असते. चार गाड्यांना ही गर्दी झेपणारी नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी आणि परतीच्या प्रवासासाठी पुन्हा गाड्या वाढविण्यात याव्या. तसेच सुरू असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Previous Post

मशालीनेच शिवसेनेचा इतिहास घडला होता ; आता पुन्हा घडणार ?

Next Post

देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

Next Post
देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group