Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मशालीनेच शिवसेनेचा इतिहास घडला होता ; आता पुन्हा घडणार ?
    राजकारण

    मशालीनेच शिवसेनेचा इतिहास घडला होता ; आता पुन्हा घडणार ?

    editor deskBy editor deskOctober 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. मशाल चिन्हावरतीच छगन भुजबळांनी विजय मिळवला होता. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीसाठी उभे करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली.

    1985 साली दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळीदेखील शिवसेनेचे चिन्ह होते धगधगती मशाल. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आली. मुंबई पालिकेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलले व शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. 1989 लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर खासदार झाले होते. म्हणजेच मशाल चिन्हावर यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवकांपासून आमदार, खासदारही निवडून आले आहेत, असे म्हणता येईल.

    केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धगधगती मशाल’ ही नवी निशाणी दिल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी शेकडो शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरले. उस्मानाबादमधील ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरात धगधगत्या मशालीच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सध्या सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले जुने व्यंगचित्र व्हायरल होत आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीच हे व्यंगचित्र ट्विट केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1984 मध्ये हे व्यंगचित्र काढले होते. “कमळ दिलं त्यावेळी सुखावलात आता मशालीची धग सहन करा” अशा इशारा त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपाला दिला होता. आता ठाकरे गटाचे नेतेही या व्यगंचित्राच्या माध्यमातून भाजप व शिंदे गटावर निशाणा साधत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.