• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आज बाणगावात पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत.

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 3, 2021
in जळगाव, सामाजिक
0
आज बाणगावात पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत.


श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत यांचा पूरग्रस्त बांधवांसाठीचा मदतीचा ओघ आजही सुरूच.

लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांचे अतिवृष्टीमुळे खूप प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यातच तालुक्यातील बाणगावात देखील शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड नुकसान झालेले आहे.गावातील घरांमध्ये संपूर्ण पुराचे पाणी आल्यामुळे अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू सडक्या झालेल्या आहेत.त्यात अनेकांचे गुरे,घरे,संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर इतर शेतकऱ्यांचे देखील शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे.

अशा बाधित बांधवांना आज मदतीची व सहकार्याची गरज निर्माण झालेली आहे.अशा बाधितांसाठी श्री सत्यसाई आपत्ती व्यवस्थापन,मेडीकेअर प्रोजेक्ट व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळ यांचा मदतीचा ओघ आजही सुरूच असून आज बाणगावात फिरता दवाखाना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाची यादी बनवून औषधोपचार व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अतिशय विदारक परिस्थिती या महापुरामुळे बाणगावात निर्माण झालेली आहे,तसेच गावात अतिवृष्टीमुळे दुर्गंधी देखील निर्माण झालेली आहे त्यासाठी समितीच्या वतीने कुटुंबाची आरोग्याची काळजी म्हणून गावात फवारणी करण्यात येणार आहे.
तसेच अमृतकलश या माध्यमातून (तूर डाळ, मूग डाळ, परिवार तेल पाऊच, चहा, साखर, टाटा मीठ, शेंगदाणे, मिरची, हळद, कपडा साबण, अंघोळीचा साबण, माचिस, मोहरी) यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे गरजू व बाधित कुटुंबांना आज वाटप करण्यात आले.उद्या देखील कन्नड तालुक्यातील व चाळीसगाव तालुक्यातील बाधित गावात या समितीद्वारे भेट घेऊन मदतीचा हा रथ अविरतपणे चालू ठेवण्याचा मानस समितीने केलेला आहे.इतरही सामाजिक संघटना यांनी पुढे येऊन या पूरग्रस्त बांधवांसाठी सहकार्य व मदतीचे आवाहन श्री सत्यसाई सेवा समिती व डॉ सुनील राजपूत मित्र मंडळाने केले आहे. याप्रसंगी उपस्थित डॉ.सुनील राजपूत, अरविंद परदेशी सरपंच, विजय देवरे सर, नारायण नथू पाटील, छोटू महाराज, समाधान शेलार, सुभाष कारभारी, विजय परदेशी, भाईदास गोलाईत, राजू पवार, दत्तू पाटील, रावसाहेब पाटील, खुशाल पवार, सत्यसाई सेवा समितीचे श्री राजेंद्र राठी, अजय जोशी, प्रितेश कटारिया सामाजिक कार्यकर्ते, प्रवीण रामचंद्र जाधव तसेच बाणगाव गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Previous Post

विकासाच्या मुद्यावरून गाजली शिरसाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा

Next Post

सात लाख रूपयांच्या गोडेतेलाच्या डब्यांची चोरी

Next Post

सात लाख रूपयांच्या गोडेतेलाच्या डब्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी : राज्यात 12 दिवस आधी मान्सून दाखल !
राजकारण

महत्वाची बातमी : राज्यात 12 दिवस आधी मान्सून दाखल !

May 25, 2025
अनैतिक संबंध असल्याचा राग : चोपड्यात एकाचा खून !
क्राईम

अनैतिक संबंध असल्याचा राग : चोपड्यात एकाचा खून !

May 25, 2025
जळगाव तहसील कार्यालयाचे “समाधान शिबीर” २५ मे रोजी संपन्न
जळगाव

जळगाव तहसील कार्यालयाचे “समाधान शिबीर” २५ मे रोजी संपन्न

May 25, 2025
वाहनात कोंबून वाहतूक : ३० उंटांची केली सुटका !
क्राईम

वाहनात कोंबून वाहतूक : ३० उंटांची केली सुटका !

May 25, 2025
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल
अमळनेर

अल्पवयीन मुलीस पळविण्याचा प्रयत्न : तीन अपत्ये असलेल्या तरुणाला अटक !

May 25, 2025
जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : ४५ रेल्वेच्या वेळेत अंशतः बदल !
क्राईम

धावत्या रेल्वेत चोरी : सहा जणांना ठोकल्या बेड्या !

May 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group