• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रक व दुचाकीचा अपघात : पत्नीचा मृत्यू तर पती थोडक्यात बचावला

संतप्त जमावाने 10 पेक्षा अधिक ट्रक पेटवले ;

editor desk by editor desk
September 28, 2022
in क्राईम, राज्य
0
ट्रक व दुचाकीचा अपघात :  पत्नीचा मृत्यू  तर  पती थोडक्यात बचावला

नंदुरबार : वृत्तसंस्था

आलापल्ली-आष्टी मार्गावरील शांतिग्राम गावाजवळ सूरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बिजोली सुभाष जयदार (45 रा. कांचनपूर) असे मृत महिलेचे नाव असून अपघातात पती सुभाष जयदार थोडक्यात बचावले. या घटनेनंतर संतप्त जमावाने 10 पेक्षा अधिक ट्रकला आग लावून पेटवून दिल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल वाहून नेणाऱ्या शेकडो अवजड वाहनांमुळे आलापल्ली-चंद्रपूर मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सुभाष जयदार पत्नी बिजोलीसह आपल्या दुचाकीने कांचनपूरला जाण्यासाठी निघाले होते. शांतीग्राम जवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात बिजोली यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर पत्नीचा जीव गेल्याने सुभाष यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
दरम्यान संतप्त जमावाने मार्गावरील 10 पेक्षा अधिक अवजड वाहनांना पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली नाही. उल्लेखनीय आहे की सुरजागड खाणीतून दररोज 400 ते 500 ट्रक्समधून कच्च्या लोहदगडांची वाहतूक केली जाते. त्यामुळे या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

परिणामी नागरिकांमध्ये सूरजागडच्या कच्च्या लोहगडाच्या वाहतुकी विरोधात प्रचंड रोष असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. पोलिसांकडून घटनेची माहिती देण्यात आली नाही. दरम्यान खराब रस्ते आणि अवजड वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. कित्येकदा मागणी करूनही प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. सुरजागड खाणितून अतिरिक्त लोहदगड काढण्याचा प्रस्ताव लॉयड्स मेटल्सने सरकारला दिला आहे. त्यासंदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने 27 ऑक्टोंबर रोजी त्या भागातील नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र संबंधित क्षेत्रातील नागरिक व ग्रामसभांनी गडचिरोली येथील जनसुनावणीस प्रचंड विरोध केला असुन सदर जनसुनावणी ही एटापल्ली येथेच घ्यावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांना सहजपणे उपस्थित राहून आपले म्हणणे मांडता येईल. त्यासाठी स्थानिक नागरिक व ग्रामसभांनी केंद्र सरकार, राज्य सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी आणि संबंधितांना इमेलद्वारे पत्र आणि निवेदनं पाठविण्याची मोहीम सोमवार पासून सुरू करण्यात आली आहे

Previous Post

मोठी बातमी ! राज्यात लवकरच सहकारी निवडणुकांचे पडघम वाजणार

Next Post

दसरा मेळाव्‍यात गर्दी खेचण्यासाठी ठाकरे-शिंदे गटांची जय्यत तयारी

Next Post
“राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या!”

दसरा मेळाव्‍यात गर्दी खेचण्यासाठी ठाकरे-शिंदे गटांची जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group