धरणगाव : प्रतिनिधी
पावसामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने व जास्त पावसामुळे बोंडावर कोंब आल्याने शेतकरी खुपच अडचणीत सापडला आहे परंतु संघटीत नसल्याने शासन, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे शेतकरी गावा-गावात संघटीत झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे हेच काम आहे असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले ते अहिरे खुर्दे येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव पाटील यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची अहिरे खुर्दे गावात शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून गिरीष गोकुळ चव्हाण,कार्याध्यक्ष म्हणून वाल्मिक सुधाकर पाटील, उपाध्यक्ष म्हणून प्रदिप एकनाथ चव्हाण,सचिव म्हणून संजय सिताराम पाटील,महासचिव म्हणून आनंदराव देविदास पाटील, खजिनदार म्हणून रावसाहेब युवराज चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख म्हणून साईनाथ भास्कर मोतिराया,यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. पुढे निवड झालेल्या शाखा कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातील नथ्थुलाल बापुराव पाटील, सुधाकर पंडीत पाटील, दगडु रामदास पाटील, सुभाष पंडित पाटील, हिंमत चैत्राम पाटील, गोकुळ संतोष पाटील, नगराज गंगाराम पाटील, चुडामण खंडू पाटील, बापुराव संतोष पाटील, गोकुळ अमृत भालेराव, मधुकर पंडीत म्हस्के, भागवत उत्तम पाटील, संजय गंभीर पाटील, संजय सिताराम चव्हाण, आनंदराव देविदास पाटील, संजय रघुनाथ चव्हाण,प्रदिप एकनाथ चव्हाण, रावसाहेब युवराज चव्हाण, वाल्मिक सुधाकर चव्हाण, योगेश श्रीराम चव्हाण, सुनील हिंमत मोतिराया, प्रदिप नथ्थुलाल चव्हाण, साईनाथ भास्कर मोतिराया, मच्छिंद्र श्रीराम देसले,गिरीश गोकुळ चव्हाण, अधिकार बाबुराव चव्हाण, समाधान अशोक चव्हाण, हर्षल उत्तमराव वानखेडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदिप पाटील यांनी मानले.