• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बकालेला वरदहस्त कुणाचा ? बडतर्फ केलेच पाहिजे : अजित पवार आक्रमक

editor desk by editor desk
September 15, 2022
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य
0
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्ह्यात

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आक्रमक पवित्रा घेत, बकालेंना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणीच अजित पवारांनी केली.

वक्तव्य खपवून घेणार नाही
अजित पवार म्हणाले, राज्यातील कोणत्याही समाजाबद्दल कुणीही काहीही आक्षेपार्ह बोलण्याची आवश्यकताच नाही. बकालेने मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे, ते खपवून घेणार नाही. त्याच्या 10 पिढ्याला आठवण झाली पाहीजे, असं काहीतरी केलं पाहिजे. बकालेला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. बकाले पोलिस अधिकारी असला म्हणून काय झालं. त्याला काय शिंग आलीयेत का? की मस्ती आलीये? हा शिवाजी महाराज तसेच शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अशी वक्तव्य अजिबात सहन केली जाणार नाही.

CM शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बकाले प्रकरणावर काय भूमिका घेतात, हे पाहायचेच आहे. शिंदे नेहमी मी आहे ना, मी आहे ना, असे सांगत असतात. आता ते या प्रकरणावर काय करतात, हे पाहतोच. या प्रकरणात बकालेला फक्त बडतर्फ करुन चालणार नाही. तर, संपूर्ण कर्मचाऱ्यांना अशा प्रकराचे वक्तव्य न करण्याबाबत सक्त ताकीद दिली पाहीजे.

बकालेवर कुणाचा वरदहस्त?
अजित पवार म्हणाले, बकालेवर कुणाचा वरदहस्त आहे का, याचाही तपास झाला पाहिजे. बऱ्याचदा अधिकाऱ्यांवर कुणाचा तरी हात असतो. त्यामुळेच ते अशी बेताल वक्तव्य करतात. कारण माझं कुणीच काही वाकड करु शकत नाही, हे त्यांना माहित असतं. पण, अजित पवार म्हणाले, बकालेवर कारवाई करा म्हणून आंदोलन करायची गरजच काय? या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळतो, सर्व मान-सन्मान दिला जातो. तरीही शिवाजी महाराजांच्या राज्यात ते असे वक्तव्य करणार असेल तर ते का खपवून घ्यावेत. शासनाने वेळीच याची दखल घेऊन कारवाई केली पाहीजे.

 

Previous Post

सोमवारी जनरल वैद्य चौकात करणार निदर्शने ; डायमंड व्हाट्स ॲप गृपच्या पुढाकारात निवेदन

Next Post

सुंठाच्या दूधाचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे

Next Post
सुंठाच्या दूधाचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे

सुंठाच्या दूधाचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group