पारोळा : प्रतिनिधी
शेतकरी ला संघटीत होण्याशिवार पर्याय नाही कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे व शेतकरी हा अख्खा जगाचा पोशिंदा आहे असं मोठ्या कौतुकाने म्हटले जाते परंतु शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती पाहता असे दिसून येत नाही,शेतकरी ची चोहोबाजूंनी फसवणूक केली जात आहे म्हणून शेतकरींनी संघटतीत झाले पाहिजे नाहीतर परिस्थिती भयंकर असेल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पुढे बोलताना सांगितले की शाखेच्या माध्यमातून शेती, आरोग्य,पाणी व पुर्णपणे शेतकरी हितासाठी कार्य केले जाणार आहे गोरगरीब शेतकरी पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ते तालुक्यातील सांगवी येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापना च्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते विनोद पाटील यांनी संघटनेचे माध्यमातून प्रास्ताविक केले व संघटना विषयी माहिती दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली शाखाध्यक्ष म्हणून रवींद्र पाटील,कार्याध्यक्ष म्हणून संदीप पाटील, उपाध्यक्ष म्हणून भिकन पाटील, सचिव म्हणून दिलीप पाटील,खजिनदार म्हणून ज्ञानेश्वर पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून आनंद पाटील यांची निवड करण्यात आली पुढे निवड झालेल्या सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले यावेळी मनसेचे मा तालुकाध्यक्ष प्रविण पाटील गावातील गुलाब पाटील, रवींद्र पाटील,गोकुळ पाटील,बालू पाटील,गोरख पाटील,भैय्या पाटील,अनिल पाटील,वाल्मीक पाटील,दगडू पाटील,भाईदास पाटील,गंजीदार पाटील,हिरालाल पाटील,गणेश पाटील,शालिक पाटील,ज्ञानेश्वर पाटील,रवींद्र पाटील,विनायक पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.