मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप सोबत युती करून आपली सत्ता स्थापन केली होती तर शिवसेनेकडे मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशिवाय फायरब्रंड नेता म्हणून कुणीही शिल्लक नसल्याने संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याची काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना असेल की संभाजी ब्रिगेड सोबत घरोबा करून पुढील रणनीती ठरवतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रादेशिक संपूण टाकण्याचं कट कारस्थान सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं मात्र न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा विषय नाही, हा लोकशाहीच्या भवितव्याचा विषय आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
आगामी सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लढवणार आहे. लोकशाही आणि प्रादेशिक आस्मिता जपण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांची युती केली आहे. लोकशाहीला चिरडण्याची भूमिका घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,असे ठाकरेंनी सांगितले आहे.
वाजपेयी यांच्या काळात जवळपास 28 जणांना सोबत घेत युती करण्यात आली होती. आता तर केवळ आम्हीच सोबत आलो आहोत. संभाजी ब्रिगेडने सत्तेसाठी आमची साथ दिली नाहीये, नाहीतर आमची सत्ता असतानाच ते आमच्यासोबत आले असते. मात्र, येणाऱ्या काळात लढवय्या सहकाऱ्यांसोबत आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करू असा दावाही उद्धव् ठाकरेंनी केला आहे.