Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर ; नव्या सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होण्याची शक्यता !
    राजकारण

    सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर ; नव्या सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होण्याची शक्यता !

    editor deskBy editor deskAugust 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    खरी शिवसेना कोणती? या शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 29 ऑगस्टरोजी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीव्ही 9 च्या दिल्लीतील सूत्रांनी ही शक्यता वर्तवली आहे. आज 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती. मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना विरोधा एकनाथ शिंदे हा खटला घटनापीठासमोर मांडण्यात येईल, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणी कोर्ट काय निर्देश देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आज दुपारपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या पटलावर ही याचिका लीस्ट झालेली नाही. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.